Monday, April 26, 2010
किमया
( पार्श्वभूमी )
मावळ प्रांतातील एक गाव छानसे
त्या किनार एका सुंदर नदीची असे
गावात ल्हानग्या घरी तरूण तो वसे
खंडोबा ज्याच्या जवळ राऊळी बसे
लवकरी ऊठावे न्याहारी करून निघावे
वनी हिंडत-भटकत, जिन्नस जमवत जावे
दो घास भाकरी ठेच्यासमवे खावे
अन् मधूर गूळाच्या खड्यात सूखा पहावे
अशी साधी भोळी आयुष्याची रेष
ना गंभीर चिंता नसती भलते क्लेष
परि ग्रहण कसे ना कळे तया लागले
ना कळे कुणा का दैव असे वागले
( आपत्ती काल )
कळस ऊडाला राऊळ भग्न जहाले
खंडोबा पडला, माल्य विखरून गेले
गावातील खंदे वीर ऊताणे पडले
कुंकू लोपले, हिरवे कंकण फुटले
हरपली शांतता, गेले सौख्य दूर
नासली निद्रा ग्लानीचा आला पूर
जागे होऊनी कळले स्वप्न नव्हते
उद्वेग, निराशा, प्रश्नच सत्य होते
जो रक्षणकर्ता तोचि तुटूनी पडला
मग मर्त्य जीवा आधार असे तो कुठला?
हा विचार घेऊनि येई आठवण एक
त्या शूर मुलाचे कार्य म्हणे तू देख
तरूण़ जरी तो असे वीरांचा वीर
तेजाचा पुंज जो, सूर्याचा अवतार
बुद्धीने तल्लख अन् मुत्सद्दी नेता
देव, देश, धर्माचा रक्षणकर्ता
( आठवणी नंतर )
नयनांस लागला दिसू ऊगवता गोळा
रंग केशरी, पोटी तेज नी ज्वाळा
जरी भासे तरीही योग मुळी हा नसे
की "भगव्या"सदृश सूर्यंबिंब ते दिसे
बळ आले अंगी तरूणा नकळत त्याच्या
रक्तातील थेंबाथेंबा फुटली वाचा
किंतु न आता ऊरे शोधता ध्येय
किमया ही त्या एकाची, जय शिवराय
Wednesday, March 31, 2010
सोनियाचा दिनू
अशोकजींना शुभेच्छा
Wednesday, March 17, 2010
परदेशी विद्यापीठांना भारताची दारं खुली
आपण सगळ्यांनीच ही बातमी वर्तमानपत्रात वाचली असेल. ह्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलीआहे. वास्तविक भारतातल्या शिक्षण संस्थांची अवस्था आणि गल्लाभरू प्रवृत्ती पाहता विद्यार्थ्यांना अधिक पर्याय मिळतील. स्पर्धा वाढेल, आणि कोणतीही निकोप स्पर्धा कधीही चांगलीच. मात्र शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा निकोप मुळीच नाही.
दुर्देवाने आज आपल्या देशात आणि राज्यात राज्यकर्ता (राजकारणी) तोच बांधकाम व्यावसायिक, तोच शिक्षण महर्षी, तोच गुंतवणूकदार, तोच ऊद्योजक, तोच क्रीडा संस्थांचा सर्वेसर्वा अशी स्थिती आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणे काम करणार्या एखाद्या परदेशी विद्यापीठाला ते स्थिरावू देतील का?
दुसरा प्रश्न असा की परदेशातल्या कोणत्या संस्था/विद्यापीठं इथे येतील? एखादं ऑक्सफर्ड, स्टॅनफर्ड येईलही. पण कदाचित असं घडेल की तिथल्या थर्ड क्लास संस्था इथे येऊन केवळ परदेशी असल्याचा फायदा ऊठवतील. अनेक विद्यार्थी फॉरेन ब्रँड ला भूलण्याची शक्यता खूपच जास्त आहे. आणि त्यांच्या चकचकीतपणा, जाहिरातबाजी, आर्थिक क्षमता ह्यात स्थानिक विद्यापीठं मागे पडतील.
आत्ताच निराशावादी सूर लावणं चुकीचं आहे. बघूया काय होतंय ते.Saturday, March 13, 2010
मराठी अभिमान गीत
' ळ' आणि 'ण' मला अतिशय प्रिय आहेत. म्हणूनच माझा मित्र जेव्हा बालेवाडी असं न म्हणता बाळेवाडी असं म्हणतो तेव्हा मला ते आवडतं (मूळ नावात 'ल' आहे का 'ळ' आहे हे माहीत नसूनही) आणि म्हणूनच श्रेयस तळपदे स्वतः त्याच्या आडनावाचा ऊच्चार जेव्हा तल्पडे असा करतो तेव्हा मला केवळ फॅशन म्हणून अंगिकारलेल्या त्याच्या इंग्रजी गुलामगिरीची चीड येते. अनेक मराठी पालक जेव्हा आपल्या पाल्याला मराठी कसं धड येत नाही हे कौतुकाने सांगतात तेव्हा मला ते ऐकून खिन्नता वाटते.
सांगायचा मुद्दा की मी मराठी आहे एवढंच न सांगता त्या गोष्टीवर भरभरून बोलत सुटण्याइतका मी मराठी आहे. माझा हा बाणा मी आनंदाने जपला आहे मात्र तो कधी अमराठी लोकांवर लादलेला नाही.ह्या पार्श्वभूमीवर, मी जेव्हा हे ऐकलं की कौशल ईनामदारने अथक प्रयत्नांनी मराठी अभिमान गीत तयार केलं आहे तेव्हा मला खूप आनंद झाला.
असंच एक गाणं 'लख लख चंदेरी' (गीत - श्रीरंग गोडबोले, अप्रतिम संगीत - अजय अतुल, गायक - स्वप्नील बांदोडकर). त्यातलं 'प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा, बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा' नंतर जेव्हा प्रभात ची तुतारी वाजते तेव्हा प्रभात युगाच्या अनेक वर्ष नंतर जन्मलेल्या माझ्या डोळ्यासमोर त्या युगाची माझ्या कल्पनेतली चित्रं तरळू लागतात. (हेच गाणं यु-ट्यूब वर बघा, ह्याच क्षणाच्या वेळचे हेमा-मालिनी च्या चेहेर्या वरचे भाव, खरंतर कोणत्याही भावाचा अभाव बघा. मराठी नसण्याचा फरक तुम्हाला दिसेल. असो.) गाण्याच्या शेवटी 'मराठी पाऊल पडते पुढे' जेव्हा येतं तेव्हा आपण अभिमानाच्या परमोच्च बिंदूला पोहोचलेलो असतो.
वास्तविक ह्यासारखी अपेक्षा ठेवून महाराष्ट्र गौरव गीताचा काही भाग नुकताच ऐकला. पण निराशा झाली. म्हणजे देवकी पंडीत चं गाणं ऐकायला जावं आणि काही अपरिहार्य कारणास्तव ते नं होता त्याऐवजी वैशाली सामंत ऐकायला मिळाल्यावर जे होईल तसं झालं. कौशल ईनामदार मुलाखतीत म्हणाले की "खूप लोकांचं असं मत आहे की ते ऐकून स्फुरण चढत नाही. पण हे तसं गाणं नाहीच आहे. हे प्रेमळ गीत आहे. भाषेबद्दल असलेल्या प्रेमाचं, ओलाव्याचं." असेल बुवा. कदाचित हा हळुवारपणा माझ्यात कमी असावा.
टीपः
पहा - अजय अतुल चे लख लख चंदेरी
पहा - मराठी अभिमान गीत
Friday, March 12, 2010
पुन:श्र्च हरि ॐ
Monday, February 2, 2009
Back from the vacation
Pune - Mangalore - Madikeri (Coorg) - Kalpetta (Wayanad) - Kozhikode - Mumbai - Pune
Day 0 - Left Pune at 6.00 p.m. Took KSRTC volvo to Mangalore. Excellent service offered by KSRTC during the journey.
Day 1 - Reached Mangalore at 8.30 a.m. Stayed at Hotel Deepa Comforts. Nice and posh executive hotel very near to the Central Bus Stand at Mangalore. Visited Pilikula Nisarg-Dhama. Had elephant ride and saw a lot of animals in well maintained zoo.
Day 2 - At 10.30 took a KSRTC bus to Madikeri. Had done online booking from Pune. Excellent booking system (One can choose the seats too). Reached Madikeri (Coorg) at 2.30. The homestay provided pickup. Stayed in HoneyPotHomes.
HoneypotHomes is an excellent home stay in a 200 acres private coffee and spice planation estate in Coorg. The owners are extremely helpful and cordial. Check out some photos of the homestay and estate here

Day 3 - Visited Talakaveri (Origin of Kaveri River) and BhagMandala. Came back to Madikeri town. Had lunch at "East End" (A must for a foodie). Went to Abbey Falls and a couple of other local places. Saw sunset at Raja's Seat.
Day 4 - Left at 8.30 and reached Dubare Elephant Camp at 9.30. Played with elephants in water. :-) Had another elephant ride. Left at 12.30. Reached Golden Temple at KushalNagar. (2nd largest Tibetan settlement in India - again a must see) On a way back visited Nisargadhama. Had Coorgi food for dinner.

Day 5 - Plantation estate/coffee plan visit. Stay at Tree house.
Day 6 - Left in the morning for Kalpetta, Waynad, Kerala. On the way saw Irupu falls. Visited Tholpetta Wildlife Sanctury and enjoyed a jungle safari. Spotted a lot of deers, peacocks, birds, a bison and a barking deer. Reached Waynad at late evening. Stayed at Meenmutty Resorts.
Meenmutty heights is an excellent resort at an amazingly quite and picturesque location. We had a river facing room with its other end on waterfall and plantation side.
Day 8 - Went for a walk in the estate. Post lunch did fishing in the stream. Couldn't catch a single fish :-) Had Ayurvedic massage followed by ice-cold "stream" bath.
Day 9 - Left in the morning for Kozhikode. On the way visited Phookot lake. Cought a train to Mumbai.
Day 10 - Reached Kurla at 12.30 p.m. Took a cab to Pune. Home by 5.30 p.m.